शनिवार, 5 जनवरी 2019

अभिव्यक्ती कि आजादी..?

अभिव्यक्ती कि आजादी..?

शोषल मिडिया हे प्रचार व नव-संपर्क माध्यम ह्यांच प्रचार व नव-संपर्क माध्यमान नव-नव्या विचारांना-लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम केले. सोबतच विचार-श्रध्दा-भावना-अभिव्यक्ती ला सोजेल त्या सगळ्या बाबींचे स्वातंत्र मुक्त व मोफत देऊ केले.
परंन्तू त्याचा गैरवापर होने साहजिक होते.

गेल्या बऱ्यांच दिवसांनपासून ( भीमाकोरेगाव प्रकरणानंतर ) बहूदा अॅड / प्रकाश आंबेडकर लोकांना समझू व नेतृत्व म्हणून मान्य असल्याचे जानवू लागले. परंन्तू बऱ्यांच लोकांचा मनात कौतुहल निर्माण झाला तो, कि आजवर न दिसलेले नेतृत्व एेकाएेक कसे काय लोकांना मान्य झाले..?
बहूतेंक लोकांच्या मनात हा प्रश्न आजही आहे आणी तो नित्याचा विषय झालेला मी मानतो. त्यामागे स्पष्टीकरण वा संदर्भ देणे मला मान्य नाही.

दिव्याखाली अंधार असतो अश्याची संख्या आंबेडकरी समाज भरपूर तेव्हा स्पष्टीकरण बांध्य हा खोळसाळ प्रकार.
बाकी आता महाराष्ट्रात नव्या तिसऱ्या वंचित बहूजन आघाडीचा धसका काही सेक्यूलर कम राष्ट्रवाद्यांना पडला याचीच बेरीज-वजाबाकी उघड-उघड दिसते. खास करुन कन्हैया-जिग्नेश-रावण ह्या त्रिकोनी व युवा नेतृत्वाची कुरकुर आज प्रत्येकांच्या मनात चालली असल्याचे उघडपणे दिसत आहे.

मुद्दा अॅड / प्रकाश आंबेडकरांचा आहे ज्यांनी कन्हैया-जिग्नेश-रावण यांच्या समर्थंनात आपली शक्ती लावली मग ती कायदेशिर असो किंव्हा आंदोलन प्रचार व प्रसाराच्या माध्यमाने असो.
ह्यात काही गैर अथवा दुमत राहणार नाही परंन्तू राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी गेल्या काही महिन्यापासून एक नवा सुळसुळात लावला तो म्हणजे आंबेडकरी खास करुन अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वास मान्य असणाऱ्या लोकांच्या मनात ह्या तिनही लोकांच्या बद्दल विष पेरुन एकवटलेला व नव्या संकल्पनेचा युवा वर्ग तोडून आंबेडकरी चळवळ व महाराष्ट्रातील तिसऱ्या  वंचित-बहूजनांनाच्या आघाडीला सत्तेच्या समिकरणात अडकवून परत सत्ता मिळवून आपली मक्तेदारी गाजविण्याचा कट आखून संपुर्ण चळवळीला बदनाम करीत वेठिस धरण्याचा कट ह्या राष्ट्रवादींच्या नेत्याकडून होत आहे. तेव्हा त्यांच्या फसव्या व दोंगल्या राजकारणाला कुणी बळी पडू नये येवढंच.

@RBI_चौक, नागपुर येथे चंद्रशेखर आझाद यांच्या भेंटीनंतर उभ्या झालेल्या प्रश्नाचे संक्षिप्त रुप..!

_रोहित भगत
सम्यक विद्यार्थी आंदोलन / नागपूर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें